१ नोव्हें, २०११

बेळगाव,कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे .....


भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय घेत असताना बेळगाव व आसपासच्या लोकांच्या भाषिक संस्कृतीचा विचार करुन बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट केले जाईल ही भाबड्या मराठी माणसांची रास्त अपेक्षा होती. पण १ नोव्हेंबर याच दिवशी बेळगावला केंद्रसरकारने जबरदस्ती कर्नाटकला देवुन टाकले. या अन्यायाचा निषेध म्हणुन तिथले आपले मराठी बांधव गेली ५५ वर्षे दरवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात.आज सुद्धा  बेळगाव व आसपासच्या भागातील आपले मराठी बांधव काळा दिवस पाळत आहेत.  महाराष्ट्रात ते सामील होवु शकत नाहीत याची खंत व वेदना उरात ठेवुन ते कर्नाटक सरकारच्या अन्यायाचा शांततामय मार्गाने प्रतिकार करत आहेत. तेव्हा मराठी भाषा व आपली संस्कृती जपण्यासाठी चाललेले त्यांचे एकाकी प्रयत्न यांना सर्व मायबोलीकरांनी सलाम करायलाच हवा.
परदेशातील मराठी माणसं आपली संस्कृती जपण्यासाठी आवर्जुन प्रयत्न करतात याची जेव्हढी दखल व कौतुक केल जात तितकही बेळगावकरांच्या नशीबी नाही.इतकी उपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवां कडुन होवुनही त्यांच मराठी माणसांवरच प्रेम काही कमी झालेलं नाही याचा अनुभव मला स्वत:ला ऑफीसच्या कामासाठी गेलो असताना आला आहे.
बेळगावकरांच्या या लढ्याबाबत असलेल्या माझ्या निष्क्रीयतेची मला खंत आहे. तुम्हाला......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: