३१ डिसें, २०११

अलविदा २०११

नववर्ष शुभेच्छांसह मायबोलीकरांना नमस्कार,
येत्या काही तासात २०११ ला अलविदा करुन सर्व जग नविन वर्ष २०१२ च स्वागत करणार आहे. जाणार प्रत्येक वर्ष प्रत्येकाच्या मनात काही कडु काही गोड आणि काही न विसरणार्‍या आठवणी ठेवुन जात असत आणि त्याला हे वर्षही अपवाद करणार नाही.
या वर्षी सुरुवातीला जपानाच्या किनार्‍यावर आलेल्या त्सुनामी मुळे त्या देशाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.एखाद राष्ट्र अश्या आपत्ती मुळे कोलमडुन पडल असत पण जपानी माणसांच्या तनामनात असलेल्या प्रखर राष्ट्रवादा मुळॆ त्या राष्ट्राने स्वत:ला त्या आपत्ती मधुन लवकरच सावरले.पण अणुभट्ट्यांच्या झालेल्या नुकसानीमुळॆ त्या देशाला असलेला अणुउत्सर्जानाचा धोका मात्र अजुनही टळलेला नाही.त्या मुळॆ अणुउर्जेच्या वापराबाबत व तिच्या निर्मितीसाठी नविन अणुउर्जा प्रकल्प उभारण्या बाबत जगभरात नव्याने विचार सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने जर्मनीला २०२२ पर्यंत अणुउर्जा प्रकल्पातुन संपुर्णपणे मुक्त करण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे.जपान येथील महाभिषण ’अणुसंकटा’ नंतर हा निर्णय घेतल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणॆ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखिल अमेरिकेतील शास्त्रज्ञांना,स्वच्छ उर्जेच्या स्पर्धेत चीन अथवा भारत हे अमेरीकेपेक्षा पुढे जाता कामा नयेत असे आवाहन केले आहे .याचाच अर्थ अमेरिका वा जर्मनी या सारखी विकसीत व भांडवलशाही प्रधान राष्ट्रे ,ज्यांची उर्जेची मोठी गरज ज्या अणुउर्जे व्दारे भागते ते त्या उर्जेला, स्वच्छ उर्जेचा पर्याय शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.आपल्या देशातील जवळपास सर्वच भागात सुर्यप्रकाश भरपुर पडतो.त्याचा योग्य वापर केल्यास स्वच्छ उर्जेचा स्वस्त पर्याय उपलब्ध शकेल. या सर्वांचा विचार करता जैतापुर सारखे नविन व अतिखर्चिक अणुउर्जा प्रकल्प यांचा पुर्नविचार करण्याची गरज आहे असे निश्चितच वाटते.
ईकडे आपल्या देशात जनलोकपाल आंदोलनामुळॆ गेले वर्षभर सर्वच वातावरण ढवळुन निघाल होतं. या आंदोलनाला आश्चर्यकारक आणि अनपेक्षित पणॆ मिळालेला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद पाहता हे राष्ट्र तरुणाईच आहे याची मनाला खात्री वाटली.अर्थात सरकारने लोकसभेत मंजुर केलेलं लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजुर झालं नाही. त्या मुळॆ वर्षाच्या शेवटी लोकपाल विधेयक परत एकदा त्याच ठिकाणी येवुन पोहचल आहे ही वस्तुस्थिती आहे.पण जर देशातल्या तरुणाईचा या आंदोलनाला असाच पाठींबा कायम राहीला तर आज ना उद्या ते मंजुर झाल्या शिवाय राहाणार नाही हे निश्चित.
या वर्षी आपल्या महाराष्ट्र देशात मराठी माणसांची राजकीय ताकद पक्षभेद विसरुन सिमाभागातील मराठी माणसांच्या मागे उभी राहील्याच प्रथमताच दिसुन आलं आहे.महाराष्ट्र विधिमंडळाने बेळगाव, कारवार ,निपाणी हा सिमाभाग महाराष्ट्राचाच भाग असल्याचा दावा केंद्र सरकारकडे करुन सिमाभागातील मायबोलीकरांच्या भावनांचा आदरच केला आहे. कर्नाटक सरकारने ’आपली’ बेळगाव महानगर पालीका बरखास्त केल्याच दुख: हे निश्चितच आहे पण त्या मुळे बेळगाव व आसपासच्या भागातील मराठी माणसांच्या मनातील मराठी अस्मिता अजुनही जागृत आहे याची जाणिव उर्वरीत मराठी समाजाला पुन्हा एकवार झाली हे नाकारता येणार नाही.
वर नमुद केलेल्या ३ घटना या प्रतिनिधिक म्हणुन मी मांडल्या आहेत.या शिवाय जगात घडलेल्या अश्या अनेक घटनांच व वैयक्तीक जीवनात घडलेल्या घटनांच सावट नविन वर्षाच स्वागत करताना आपल्या प्रत्येकाचाच मनात असणार आहे. पण त्यांची प्रगट अभिव्यक्ती अनेकांनी फेसबुकवर केलेल्या अत्यंत अभ्यासु आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मधुन व्यक्त झालेली आहे.त्या मुळे फेसबुकवरच्या प्रतिक्रिया वाचताना अंर्तमुख होण्या बरोबरच मजाही आली.आजची तरूणाई तर घरातल्या माणसां पेक्षा फेसबुकवर जास्त व्यक्त होते ही आता वस्तुस्थिती आहे.त्या मुळे फेसबुक,ट्वीटर सारख्या माध्यमां मधुन व्यक्त होवु पाहाणार्‍या तरूणाईकडे सगळ्यांनीच गांभिर्याने पाहण्याची व त्यांना समजुन गरज आहे ना की त्या माध्यमांवर बंदी घालण्याची.असो.
आज आपण परत एकदा नविन वर्षाच स्वागत करायला तयार झालो आहोत.आपल्या जीवनात उद्या अधिक चांगल नक्कीच काही घडणार आहे आहे हा आशावादच नविन वर्षाच जल्लोषात स्वागत करायला आपल्याला भाग पाडत असतो. हा आशावाद म्हणजेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही का?.जगजीतसिंग-चित्रा यांची "दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है"ही गझल आपल्याला जीवनाकडे कश्या दृष्टिकोनातुन बघाव या बद्दल अर्थपुर्ण शब्दात सांगते.....
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है ....
बरसात का बादल तो दिवाना है क्या जानें
किस रांह से बचना है किस छत को भिगोंना है
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है .....
गम हो या खुशी दोनों कुछं देर के सांथी है
फिर रस्तां ही रस्तां है हसनां है या रोनां है
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है ....
तेव्हा देवाने आपल्याला दिलेल जीवन हे अमुल्य आहेच पण त्याहुन महत्वाचा आहे जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला असा दृष्टिकोन.हा दृष्टीकोनच आपल्याला दुसर्‍यांपेक्षा वेगळ ठरवत असतो. तेव्हा आपलं वेगळेपण जपतानाच दुसर्‍याचा दृष्टिकोन समजुन घेण्याचा प्रयत्न करुन पाहुया.

.

४ डिसें, २०११

हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........



देव आनंद यांच्या निधना नंतर प्रतिक्रिया देताना संगितकार खय्याम म्हणाले,
 
" देव आनंद यांच्या अचानक जाण्याने खुप धक्का बसला."  अश्याच प्रकारच्या प्रतिक्रिया खुप जणांनी दिल्या आहेत. वास्तविक पाहाता ८८ वर्षांच्या वयाच्या माणसाचं निधन म्हणजे अचानक बसलेला धक्का असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण हे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत खरं असलं तरी देव आनंद यांच्या बाबतीत लागु होतं नाही.


देव आनंद म्हणजे मुर्तीमंत उत्साह.
 
 
गेले काही वर्षे ते जितक्या उत्साहाने नविन नविन चित्रपट काढत होते तितक्याच निरुत्साहाने प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांना प्रतिसाद देत होते. पण त्याचा कुठलाही परीणाम देवसाब यांच्यावर झाला नाही. परवाच्या, कालच्या आणि आजच्या अश्या तिन पिढ्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांनी आनंद दिला आहे. आणि खात्री आहे पुढच्या पिढीलाही त्यांचे चित्रपट आनंद देणार आहेत. कारण देवसाब यांच्या चित्रपटांचा आनंद लुटायचा असेल तर अट एकच ते म्हणजे मनाने तरूण असणं.

देवसाब जीवन जगले ते काळाबरोबर.
 
त्यांनी कधिही मागच्या काळाच्या आठवणी काढुन उसासे टाकल्याचं ऐकीवात नाही. त्यांच्या जगण्याच वर्णन त्यांच्याच चित्रपटा मधिल गाण्यामधुन व्यक्त होतं. ते म्हणजे," मै जिंदगी का साथ निभांता चला गया,हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........."