११ ऑक्टो, २०११

तो होता म्हणुनच ........

तो त्याला पहिल्यांदा भेटला त्याला साधारण पणे २९-३० वर्षे सहज झाली असतील. तो आणि त्याची सर्व मित्रमंडळी कोजागिरीपौर्णिमा साजरी करायला भामरागडच्या जंगलात गेले होते. एका मित्राचा मोठा भाउ फॉरेस्ट रेंजर होता त्यानेच हा बेत आखला होता. भर जंगलात , तेही भामरागड सारख्या वाघाचं अस्तित्व असलेल्या जंगलात, वस्ती पासुन काहीश्या दुरच असलेल्या छोट्या मैदानात कोजागिरी साजरी करण ही कल्पनाच भन्नाट होती. आकाशातला पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश व दुध आटवण्यासाठी पेटवलेली शेकोटी एव्हडाच काय तो उजेड. त्यामुळे रेंजर साहेबांनी संरक्षणासाठी रायफली असलेले २ शिपाई सोबत दिलेले असले तरी सगळ्यांच्या मनात अनामिक भिती चोरपावलांनी शिरली होतीच. त्या मुळे सुरुवातीचे २ तास गप्पा टप्पा करण्यात गेल्या नंतर पुढे कसा वेळ घालवायचा हा प्रश्नच होता. वन्य श्वापदांची भिती असल्याने आजुबाजुला फिरायला जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यातच त्यांना त्या ठिकाणी सोडुन गेलेली जीप सकाळीच परत नेण्यासाठी येईल याची मित्राच्या फॉरेस्ट रेंजर भावाने पुर्व कल्पना दिलेली असल्याने जंगलात रात्र जागवण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ह्ळुहळु गप्पांचा आवेग कमी झाला आणि सर्व जण त्या जंगलाचाच भाग असल्या सारखे त्या जगावेगळ्या अनुभवाचा थरार अनुभव करायला लागले. त्या शांत व निरव वातावरणतला एकटेपणा अलगद्पणे सर्वांच्याच मनामध्ये झिरपत गेला आणि प्रत्येकाच जणु एक स्वतंत्र बेटच तयार झालं.
तो सुद्धा पाठीवर पडुन अंगावर झिरपणारा चंद्राचा शितल प्रकाश अनुभवत होता. त्या शितलतेमुळे त्याच्या मनातला कोलाहल कधी शांत होत गेला ते त्याला कळलच नाही. त्याच वेळी तो त्याच्या कानात ह्ळुच गुणगुणला.........
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा
कुछने कहां ये चांद है
कुछने कहां चेहरा तेरा.....
हम भी वहीं मौजुद थे
हमसे भी सब पुछा किये
हम हंस दिये हम चुप रहें
मंजुर था पर्दा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा .....
त्याला मात्र उगाचच कोणीतरी आपली चोरी पकडली अस वाटल आणि त्यानं चमकुन आजुबाजुला बघीतल. पण कोणाचच त्याच्या कडे लक्षच नव्हतं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला कारण त्याच ते गुपीत एव्हड्या लवकर मित्रांना कळावं असं त्याला वाटत नव्हतं.
तो मात्र त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता.....
ईस शहर मे किससे मिलें
हमसे तो छुठीं मेहफीलें
हर शख्स तेरा नाम ले
हर शख्स दिवाना तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
काही दिवसां पुर्वीची गोष्ट. त्याला कॉलेज मध्ये नविनच आलेली एक मुलगी आवडायला लागली होती. तिलाही तो आवडत असावा अस वाटत होत पण खात्री नव्हती. त्यामुळे मित्रांना ही गोष्ट एवढ्यात कळण ईष्ट नव्हत. त्यासाठी तो आजकाल ग्रुप पासुन थोडासा फटकुन वागत होता. आल्या-गेल्या प्रत्येक मुलींवर कॉमेंट्स पास करण हा त्याच्या ग्रुपचा अलिखीत नियम. त्या मुळे तिनं आपल्याला ग्रुप बरोबर पाहु नये याची काळजी त्यानं घेण साहाजिकच होतं.त्यातच ही नविन चिवळी जरा जास्तच लांब नाकाचीआहे असं त्याच्या ग्रुपच मत असल्याने तिची आणि ग्रुपची लवकरच चकमक उडणार हे स्पष्ट्च होत. आपल्या प्रेमाच बलीदान या चकमकीत होवु नये या साठी त्याच काळजी घेण योग्यच होतं.
कुचे को तेरे छोंडकर
जोगी ही बनजांये मगर
जंगल तेरे परबत तेरे
बस्ती तेरी सेहरा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
तो तिच्या एवढ्या प्रेमात पडला होता की एखाद्या दिवशी ’मॅडम’ दिसल्या नाहीत की त्याला फार फार उदास वाटायच. पण सांगतो कुणाला ?. त्या मुळे आपल्या ग्रुप मध्ये असुन सुद्धा त्याला अगदी ’लोन्ली’ वाटायचं. मग संध्याकाळी तिच्या गल्लीत सायकल वरुन याच्या सारख्या चकरा होत होत्या. तिच्या गल्लीतल्या मुलांना देखिल याच चकरा मारण लक्षात आल होतच त्यामुळे नजरेची ठसन देण वैगरे सुरु होत. पण पुरावा नसल्यानं या ’दादाभाईं’ना याच्यावर हात टाकता येत नव्हता.
बेदर्द सुन्नी हो तो चल
कहता है क्या अच्छी गझल
आशिक तेरा रुसवा तेरा
शायर तेरा इन्शा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
त्यातच मॅडमच वागणं. कधीकधी अशी बघायची की जैसे पसंत है मजनु तर कधि कधि ओळख नसल्या सारख पाहाणं. त्या मुळे तिच्याशी बोलायच धाडस याला होत नव्हतं. पण ही कोंडि लवकर सोडवण भाग होत कारण आज ना उद्या याच तिच्यावर ’मरणं’ ग्रुपच्या लक्षात आलच असतं. तेव्हा तिच्याशी बोलायची संधी साधणं आणि तेही ग्रुपच्या अपरोक्ष या साठी याचे आटॊकाट प्रयत्न सुरु झाले......आणि शेवटी ती वेळ आलीच. पण नको त्या वेळी.
तिची येण्याची वेळ लक्षात ठेवुन नेहमी प्रमाणे तो मित्रां बरोबर चकल्लस करत उभा होता. मुलींना या टवाळ ग्रुपची माहिती असल्याने त्यां यांच्या नेहमीच्याच कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करुन निघुन जात होत्या. इतक्यात ती अचानक समोरुन आली. यानं पळ काढण्या पुर्वीच तिच्यावर पण ग्रुपच्या कॉमेंट्स पास झाल्याच. तिने मात्र कॉमेंट ऎकुन ग्रुप कडे रागाचा कटाक्ष टाकला. याला ग्रुपमध्ये पाहुन तर तिनं त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. तिने त्याच्यावर टाकलेल्या नजरे वरुन तिला याच तिथं असणं अजिबात पसंत पडलेल नाही हे त्याच्या लक्षात आल. पण अश्या वेळी ग्रुपला सोडण म्हणजे बेईमानी झाली असती. यान तिचा नजरादेश धुडकावल्यान ती याच्याकडे तिरस्काराचा जहरीला कटाक्ष टाकुन तणतणत निघुन गेली.मग काय..... दिलके टुकडे हुवे हजार , कही ईधर तो कही उधर अशी या आशिकची हालत झाली.
अश्या प्रेमभंग अवस्थेत ’ कोजागिरी’चा कसला मुड असणार याला. पण ग्रुपसाठी आपलं सगळ दुख: विसरुन महाशय आले तर ईथे हे महाराज सारख कानात गुणगुणत बसलेले. पण खरच होत की या महाशयांच म्हणणं. तिचच तर अस्तित्व सगळीकडे जाणवत होतं. या जंगलात सुद्धा ती ईथेच कुठेतरी जवळच आहे याची अनुभुती याला होत होती हे नाकारता कसं बरं येईल.
 

२ टिप्पण्या:

Devendra म्हणाले...

जगजीतसिंग यांची " कल चौदह्वी की रात थी, शबभर रहा चर्चा तेरा" ही मला अत्यंत आवडलेली गझल. त्यांच्या मखमली व मुलायम आवाजातल्या गझलां मध्ये दुखावलेल्या मनावर अलगद फुंकर घालण्याची ताकद होती. माझ्या आवडत्या गझलेचा माझ्या परिने परिचय करुन देण्याचा हा प्रयत्न म्हणजे माझ्या सारख्या सामान्य रसिकाची त्यांना वाहीलेली श्रद्धांजलीच आहे.

jayaballoli म्हणाले...

phar sundar gazhal aahe hi ani maji pan far avadati aahe; thanks for this post; Jagajit ji na shradhanjali.