२ मे, २०१५

गझलकार निदा फाजली


आजच्या शनिवार दिनांक २ मे २०१५ च्या लोकसत्ता-चतुरंग पुरवणीत डॉ राम पंडीत यांनी ’सहर होने तक’ या त्यांच्या सदरात या वेळी गझलकार निदा फाजली यांच्या गझलांचा समर्पक परिचय करुन दिला आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/urdu-poet-nida-fazli-1098198/?nopagi=1 या लिंकवर क्लिक केल्यास तो संपुर्णलेख वाचता येईल.
डॉ पंडीत यांचा लेख कितका सुंदर आणि समर्पक आहे की गझलकार निदा फाजली यांच्या प्रतिभेचा संपुर्ण परिचय होतो. मग या लेखाचा ब्लॉगवर विषेश करुन उल्लेख करण्याच प्रयोजन काय.
प्रयोजन इतकच आहे कि डॉ पंडीत यांनी फाजली यांच्या गझल थॊडक्यात दिल्य़ा आहेत. तेव्हा डॉ पंडीत यांच्या लेखाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल आणि शायर निदा फाजली यांच्या शब्द प्रतिभेची ओळख करुन घ्यायची असेल तर त्यांच्या गझला पुर्णपणे समजुन घ्यायला ह्व्यात .......
तेव्हा माझ्या कडे असलेल्या निदा फाजली यांच्या ३ गझला मी इथे देत आहे. याच गझला द्यायच कारण म्हणजे त्या गझला माझे सर्वात आवडते गझल गायक जगजीतसिंग यांनी त्या गायल्या आहेत...
१- दुनिया जिसे कहते है जादु का खिलौना है
मिल जाये तो मिट्टि है खो जाये तो सोना है
अच्छा सा कोई मौसम तनहाई का कोई आलम
हर वक्त का रोना तो बेकार का रोना है.......
बरसात का बादल तो दिवाना है क्या जाने
किस राह से बचना है किस छत को भिगोना है......
गम हो के खुशी दोनो कुछ देर के साथी है
फिर रस्ता हि रस्ता है हसना है या रोना है...........
२- हर तरफ हर जगह बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयों का शिकार आदमी...
सुबह से शाम तक बोझं ढोता हुआं
अपनी ही लाश का खुद मजार आदमी...
हर तरफ भागते दौडते रास्ते
हर तरफ आदमी का शिकार आदमी ...
रोज जीता हुवां रोज मरता हुवां
हर नये दिन नया इंतजार आदमी...
जिंदगी का मुक्कदर सफर दर सफर
आखरीं सांस तक बेकरार आदमी....
३- होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चिज है
इश्क कीजे फिर समझीये जिंदगी क्या चिज है .....
उनसे नजरे क्या मिली रोशन फिजांये हो गई
आज जाना प्यार की जादुगरी क्या चिज है .....
खुलती झुल्फों ने सिखादी मौसमो को शायरी
झुकती आंखों ने बताया मैकशी क्या चिझ है ....
हम लबोंसे कह ना पाये उनसे हालें दिल कभी
और वो समझे नही ये खामोशी क्या चिज है
मला वाटत शायर निदा फाजली यांच्या शब्द प्रतिभेचा परिचय करुन द्यायला वरच्या तीन गझला पुरेश्या आहेत.

आणि हो डॉ पंडीत यांच्या सुंदर लेखाचा अधिक चांगला आस्वाद घ्यायलाही.

 
 

१ मे, २०१५

महाराष्ट्र दिन -१ मे २०१५

आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. ५५ वर्षांपुर्वी हे राष्ट्र, होय राष्ट्रचं, स्वकीय राज्यकर्त्यांशी सनदशीर संघर्ष करुन व १०६ हुतात्मांच बलीदान देवुन या लढवय्या मराठी माणसांनी मिळवलं आहे.अर्थात मराठी माणसांना संघर्ष काही नविन नाही. पण या लढ्याची फारशी जाणिव आत्ताच्या मराठी समाजाला आहे असे जाणवत नाही. एखाद्या माणसाला अचानक वडीलार्जीत संपत्ती मिळाल्या वर तो जशी बेजबाबदार पणे ऊधळपट्टी करेल तसच काहीसं आपण आपल्या राज्या प्रती वागत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वरा समोर स्वतंत्र राजसत्तेची शपथ घेतल्या नंतर मराठी समाज या ना त्या कारणाने देश रक्षणासाठी लढतच होता. महाराजांनी रोहिडेश्वरा पुढे स्वतंत्र राजकीय सत्तेचा जो संकल्प सोडला होता तो फक्त आत्ताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिमेपुरताच मर्यादीत नक्कीच नव्हता. महाराजांनी स्वप्न पाहीले होते ते एका साम्राज्याचे, मराठी साम्राज्याचे. मराठी साम्राज्याचे स्वप्न मनात असल्यानेच महाराजांनी राज्याभिषेक झाल्या नंतर मराठी भाषेतील राज्य व्यवहार कोष तयार करण्याचे काम हाती घेतले. त्या मुळे महाराजांच्या राजधर्माचा मुळस्त्रोत हा जरी सहिष्णु हिंदु परंपरेचा असला तरी या राज्याच्या प्रशासनाची भाषा मराठीच असली पाहीजे हे त्यांच्या मनात नक्की होते.महाराजां बद्दल बरेच काही लिहीले गेले आहे आणि पुढेही लिहीले जाणार आहे यात शंकाच नाही. पण आज आपण ज्या महाराष्ट्र धर्मा बद्द्ल बोलतो ती संकल्पना त्या महापुरुषाचीच होती हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यामुळे महाराजांनी ज्या क्षणी रोहिडेश्वरा समोर स्वतंत्र राजकीय सत्तेची शपथ घेतली तो क्षण म्हणजेच महाराष्ट्रया राष्ट्राची स्थापना असे मी मानतो. महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार झाला तो थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात.त्याचीच परिणीती म्ह्णजे दिल्लीच्या मुघल बादशहाने मराठ्यांना त्याच्या प्रदेशातुन चौथाई वसुल करण्याची सनद देण्यात झाली. थोडक्यात काय मराठ्यांचे राजकीय व सामरीक प्रभुत्व बादशहाने कबुल तर केलेच पण त्याच्या स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी पण त्याने मराठ्यांवरच टाकली. ही गोष्ट सिद्ध करते मराठ्यांच शौर्य व प्रभुत्व संपुर्ण हिंदुस्तानने जणू काही मान्यच केले होते.

मग प्रश्न पडतो की, आजचा महाराष्ट्र हा महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र आहे का? ज्या महाराष्ट्र धर्माची स्थापना महाराजांनी केली तो आज अस्तित्वात आहे का? आपल्या राज्याची राजभाषा मराठी असावी असे जे स्वप्न महाराजांनी पाहीले ते आज पुर्ण झाले आहे का?. महाराज हे सर्व सामान्यांना आपले वाटत होते त्या मुळे महाराजांच्या मराठी साम्राज्याच्या स्वप्नासाठी मराठी समाजाने आपल्या पिढ्यान पिढ्या रणांगणावर खर्ची घातल्या आहेत. महाराजांनी मराठी समाजाला स्वप्न तर दाखवलेच पण त्यांच्या समोर ध्येय ठेवले ते त्यांच्या आपल्या साम्राज्याचं. आपला इतिहास साक्षी आहे की हे ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्या मराठी समाजाने अविरत संघर्ष केलेला आहे. कुठलीही अपेक्षा न बाळगता मराठी समाज हे ध्येय साध्य करण्या साठी लढत राहीला त्या बद्दल आपण आपल्या पुर्वजांचे ऋणी असलेचं पाहीजे.

मराठी समाजाच्या शौर्याचा परमोच्च बिंदु म्हणजे पानिपतची तिसरी लढाई ( सन १७६१, दिवस १४ जानेवारी) असे मी मानतो. या लढाईतल्या मराठ्यांच्या पराक्रमाच कौतुक शत्रुने, प्रत्यक्ष अहमदशाह अब्दालीने केलं आहे. जगाच्या इतिहासात एकाच दिवशी लाखो सैनिक प्रत्यक्ष लढताना मृत्युमुखी पडल्याच दुसरं उदाहरण नाही. हे युध्द मराठे लढले ते हिंदुस्तानचे रक्षणकर्ते म्ह्णुन. त्याच बरोबर या देशाच्या सिमा कोणत्या असाव्यात हे या युद्धाने नक्कि केले. हे युध्द मराठे जर जिंकले असते तर हिंदुस्तानचाच नव्हे तर जगाचा इतिहास बदलला असता. मराठी साम्राज्याचे स्वप्न पुर्ण होण्याचा तो क्षण लढाईतल्या काही घटनांनी उधळला गेला. मराठे जिंकले असते तर इंग्रजांना या देशावर राज्य करताच आलं नसतं. काहीश्या फरकान आपण युध्द हारलो पण पानिपताच्या तिसर्‍या लढाईच वैशिष्ठ हेच की विजयी पक्षाला दिल्लीवर राज्य करता आल नाही. या लढाईत अब्दालीच एव्हड नुकसान झाल की तो परत तर गेलाच पण त्या नंतर खैबरखिंडीतुन या देशावर हल्ला करण्याच धाडस कोणीच दाखवलं नाही. इतका गौरवशाली इतिहास असलेलं राज्य / राष्ट्र किंवा समाज आपल्या हिंदुस्तानात दुसरा कोणताही नाही.पण तरीही आपल्याच महाराष्ट्रात मराठी समाज, मराठी भाषा व मराठीमोळी संस्कृती यांची पदोपदी अवहेलना करण्याची मग्रुरी का दिसुन येते?

व्यापार-धंदा गुजराथी-मारवाड्यांच्या हाती, बिल्डर्स परप्रांतीय, हॉटेल्सवाले दाक्षिणात्य(बहुतांश शेट्टी), काहि अपवाद सोडले तर मराठी व्यक्तिरेखा सिनेमात दिसते ती कामवाली बाई किंवा शिपायाच्या भुमिकेत, शेयर मार्केट मध्ये मराठी माणुस असलाच तर सर्वसामान्य गुंतवणीदार म्हणुन मग आपल्या समाजाचं अस्तित्व जाणाव असे आपण आहोत तरी कोठे? एक सरकारी नोकरी आणि दुसरं राजकारण. पण खाजगीकरणाचे वारे वाहात असताना व परप्रांतीयांचे लोंढे सातत्याने येत असताना भविष्यात या दोन क्षेत्रात,सरकारी नोकरी आणि राजकारण, तरी मराठी माणुस शिल्लक असेल का याची साधार शंका मनात उभी राहाते. शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज थोड्याफार प्रमाणात शिल्लक असेल तर खेड्यापाड्यात."अमृतातेही पैजा जिंकी" असं जीचं सार्थ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे अशी आपली मराठी भाषा महाराष्ट्राच्या राजधानीत व सरकारी खात्यांमध्ये स्वत:चा शोध घेत वणवण फिरत आहे.

आजचाच TIMES OF INDIA पाहा. पहिल्या पानावर महाराष्ट्र दिना बद्दल येका ओळीचाहि उल्लेख नाही. इथे प्रकाशित होणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्रात शिवजयंतीचा , महाराष्ट्र दिनाचा उल्लेख देखिल न करण्याचा उपमर्द कसा होवु शकतो. मराठी माणुस इंग्रजी वर्तमानपत्रांचा ग्राहक नाही का?. हे होत कारण मराठी माणुस, मराठी संस्क्रुती यांच्या खिसगणतीतच नाही.

मध्यंतरी माझा एक मित्र कोकणात फिरण्या साठी गेला होता. त्याला असं दिसुन आलं की समुद्रकाठच्या गावां मधिल जमिन विकत घेण्याचा सपाटाच परप्रांतीयांनी लावला आहे. मला वाटतं हेच चित्र महाराष्ट्राच्या सर्वच भागात असेल. जमिन विकण्याची मराठी माणसांची निकड खरी की त्या जमिनी विकत घेण्यातली परप्रांतीयांची दुरदृष्टी खरी याचा सारासार विचार मनाशी केला तर जे उत्तर येतं हे मनात खंत निर्माण केल्या शिवाय राहाणार नाही. शहरातील जागांचे भाव न परवडल्याने दुरदुरच्या खेड्यांमध्ये ( वसई, विरार, डोंबिवलि ,टिटवाळा, बदलापुर ही काही वर्षां पुर्वी खेडीच होती ना?) फेकला जाणारा पांढरपेशा नोकरदार मराठी माणुस एक-एक इंच मागे-मागे सरत जेव्हा आपल्या मुळच्या गावापर्यंत रेटला जाईल त्या वेळी त्याला विदारक जाणिव होईल की आपल्या मुळ गावात देखिल आपल्या मालकीचं असं काहीच शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा कुठे पळणार आहोत आपण..... . ही वस्तुस्थिती फार भयानक आहे पण दुर्दैवाने ती सत्यच आहे. आज आपल्याला गरज आहे ती शेलारमामां सारख्या जागृत नेतृवाची. आपले पळतीचे सर्व मार्ग नाहीसे झाले तर आणि तरच आपल्या पुढीला काही शिल्लक राहाण्याची शक्यता आहे.

राजकीय किंवा युध्दजन्य कारणाने एखाद्या समाजाच टप्प्याटप्प्याने माघार घेत जाणं समजुन घेता येतं. पण आपल्याच राज्यात आपलचं राजकीय नेतृत्व अद्याप शिल्लक असताना असं होणं हे अनाकलनीय व सुन्न करुन टाकणारं आहे. हिटलराच्या काळात ज्यु समाजाला नियोजन बध्द रितीने हद्दपार केलं गेलं. त्याला एक्झोड्स (Exodus) असा इंग्रजी भाषेत शब्द आहे. एक्झोड्स या शब्दाचा अर्थ आहे," A journey by large group to escape from hostile environment.The departure of the Israelies out of slavary in Egypt led by Moses.".

तेव्हा मराठी माणसांच पण एक्झोड्स होतयं की काय? आणि होत असल्यास त्याला जबाबदार कोण? याचा विचार आत्ताच व्हायला हवा. नाहीतर एक उत्सव म्हणुन अजुन २५ वर्षांनी देखिल " महाराष्ट्र दिन " ," मराठी भाषा दिवस" साजरा होईल पण अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन कोणी सिंग असेल आणि आपले लाडके बाबु मोशाय अमिताब बोलबच्चन त्यात मराठी माणसांना हिंदीत २ मिनिटं श्रध्दांजली वाहुन हिंदी कविता सादर करतील.....

असो. या प्रश्नांची उत्तरं साधी -सरळ नाहीत .कारण याचं जे उत्तर असेल ते पहिल्यांदा आपल्या प्रत्येकाकडेच बोट दाखवणार आहे. त्या मुळे यावर उपाय शोधायचा कोणी असेल तर तो आपणचं. तेव्हा मग परत शिवचरीत्र आठवायला सुरुवात करायची आणि म्हणायच,

" छत्रपती शिवाजी महाराज की ...... जय".

हा महामंत्र उच्चारला की आपल्या मनगटांना त्यांच्या पोलादी असण्याची परत एकदा जाणिव होईल.

तेव्हा महाराष्ट्र दिन साजरा करताना...

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती साठी बलीदान केलेल्या हुतात्म्यांच स्मरण करुया, बेळगाव-कारवार- निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच भान ठेवुया, माय मराठी विश्वभाषा व ज्ञानभाषा होईल या साठी यथाशक्ती प्रयत्न करुय़ा अन जातीपातीच्या पलीकडे विचार करणारा मराठी समाज निर्माण करुया ....

हे केल तर अन तरच छ्त्रपति शिवाजी महाराजांचा समर्थ महाराष्ट्र अस्तित्वात येईल.

आणि हेच महाराष्ट्र दिन साजरा करण्याच प्रयोजन अन उद्देश असावा अस मला वाटत.

जय महाराष्ट्र जय मराठी