७ जून, २००९

त्याची गोष्ट

तो...........
कालपासून बरेच वेळा सेलकडे हात गेला.काय करावं तेच कळत नव्हत.अशी द्विधा मनस्थीती का बर व्हावी याच कारण खरच कळत नव्हत की समजुन उमजुन मन सत्य नाकारत होत ?. सत्याला समोर जायच धाडस होत नव्हत हेच खरं.
गेल्या काही दिवसन पासुन सगळ्याच गोष्टी चुकत होत्या.पण नक्की काय चुकत होत तेच कळत नव्हत त्यामुळे होणारी चिडचिड मित्रांना आणि विशेषत: घरातल्या पण सर्वानां जाणवत होती. काही थोडही मनविरुध्द झाल की संताप यायचा आणि त्याची झळ समोरच्याला बसत होती. असे किती जवळचे त्यामुळे दु्खावले हेही कळल नाही.
पण शेवटी कुठेतरी हे सगळ संपवायला हवच होत.मनाचा हीय्या करुन नंबर लावला. सेलवर तिच ओळखीची ट्युन वाजत होती.माझ्या खुप आवडीची, जगजीतसिंगची जो तिच्याही आवडीचा होता. पण आज जगजीतसिंगचा मखमली आवाज कानातुन मनात उतरायला तयारच नव्हता. त्यालाही कळली असावी माझी मनस्थीती बहुदा.
कॉल डिसकनेक्ट होतो की काय अस वाटत असतानाच........
"हॅलो " असा आवाज आला.
क्षणभर हा भास की सत्य तेच कळल नाही. पण सवईन उत्तर दिल गेलं
"मी बोलतोय"
ती : बोल ना?
नेहमीचाच स्वर,शांत आणि निर्विकार... इतर वेळी अस तिव्रतेन जाणवल नसत कदाचीत..
 
पण आज मात्र सगळच जाणवत होत....प्रत्येक श्वास आणि निश्वास " आज भेटुया"
ती : का रे , काही विशेष ?
थोडासा तडकलोच......
"काही विशेष असेल तरच भेटायच का?"
ती : तस नाही रे
नेहमीचीच लकब.... आपल काही चुकलय अस हीला का बर वाटत नाही
की माझच मन चुकीचा विचार करतय...... कोण जाणे
"मग भेटुया,संध्याकाळी"
ती : नेहमीच्या ठिकाणी ,संध्याकाळी ६ वाजता भेटूया
घड्याळाचा काटा ६.३० वाजले दाखवत होता. तिचा मात्र पत्ता नाही.
.................
 
७ वाजता एकदाच आगमन झाल.
खात्री होतीच पण तरीही निरखुन पाहिल.उशिर झालाय याची चेहरयावर जाणिव नाही... नेहमी प्रमाणेच
की मी वाट पाहिनच याचा विश्वास
(ही नेहमीच अस मला गृहीत धरते की आजच......)
मला वाटल, आलीय एकदाची तर किमान ती सुरुवात तरी करेल .....
"कशी आहेस"
ती : बरी आहे.
ती : कशाला भेटायला बोलवलस.. गडबडीत
(आश्चर्य........... आज एकदम मुद्दावर ... हिच्या स्वभावाशी आगदीच विसंगत वागतेय)
"भेटावस वाट्ल"
ती : खरच, हेच कारण आहे.
"दुसर काय असेल"
" आपल्याला भेटायला कारण कधि पासुन लागायला लागल"
वाटल होत बया काही बोलेल
पण ठिम्म... उशिरा आल्याची खंत पण नाही. काय समजते स्व:ताला.
मग मात्र माझा संयम सुटला. खुप काही बोललो.. आठवत नाही काहिच....... खर म्हणजे त्याची आता गरजच नाही.
बोलता बोलता लक्षात आल...... बयेच माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही.
(आजच की नेहमी प्रमाणे........)
पण नजर मात्र माझा चेहरा न्याहळत होती ....
(काय पाहत होती बया ?)
मग टेप अचानक तुटुन रंगलेल गाण बंद पडाव तस गप्पगार झालो.
बयोची नजर मात्र तशिच....एकटक खिळलेली
काय पाह्त होती......... काहिच उमजलं नाही.
थोड्या वेळ असाचं गेला... मला तिचं ते पाहण आवडत होत पण ते त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ करत होत.
एकदाचि ती भानावर आली.
ती : झाल बोलुन....
 
(ऎकलस का बयो )
...........................................................
ती : बोल ना रे ? मला उशिर होतोय.
(म्हणजे तुला काहीच बोलायचं नाही तर.......)
" निघतेस....... "
( बोलण्याची तुला इछ्छाच दिसत नाही की.......)
( तुला काय ही एकपात्री एकांकीका वाटली का? )
ती : जायला हवं रे. खरच...
(न बोलताच निघतेस.... का बरं... खरचं तुला काहिच बोलायच नाही का ? हे तरी स्पष्ट बोल ना बयो )
ती : जाते रे.
 
(जातो नाही येतो म्हणाव अस तुच म्हणायचीस ना ? विसरलीस ... तुझच जर विसरलीस मग माझ काय लक्षात ठेवशील ............... )
ती : जाते ना.. प्लिज.
......................................
ती : रिक्शा
ती : बाय
 
(नेहमी प्रमाणे " भेटु या " पण नाही)
आपण आज जे भेटलॊ त्याला भेट का बर म्हणायच ?मी बोललो ते तुझ्यापर्यंत पोहोचल नाहीच आणि तुला जे (कदाचीत) बोलयच ते तु बोललीच नाहिस.पण मन मात्र सांगत होत.खुप काही तुटलय ... खुप काही..
न सांगता येण्यासारख .... न जोडता येण्यासारख.
घरी आलो. शांत. मयताला जाउन येतात तसं ................... .भरपुर जेवलो पण मुकाट्याने .म्हणतात मन दुखावलेलं असेल तर जेवण जास्त जातं.
माझ्या खोलीत गेलो. मोबाईल काढला...... ईयरप्लग कानात टाकले..( खरं सांगायला हरकत नाही..एकदा असं वाटत होत की चांगले चार-पाच जुन्या साधुचे .. ओल्ड मॉंकचे पेग मारावेत म्हणजे बेसुध झोप येइल. पण त्याने शरिर झोपलं असत पण उससे "दिल" का क्या होता ? )
तु नव्हतीस पण माझा जगजीतसिंग तर माझ्या सोबत होता (.........असेल... आणि नेहमीच राहील)
आता मात्र रात्रिच्या शांत वातावरणात त्याचे मखमली स्वर कानातुन मनात अलगद उतरत होते.
एकामागून येक.......
कभी खामोश बैठोगे ...कभी कुछ गुन गुनाओगे.
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....
कोई जब पुछ बैठेगा खामोशी का सबब तुमसे
बहोत समझाना चाहोगे ,मगर समझा ना पाओगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....
 
कभी दुनिया मुक्कमल बनके ,आयेगी निगाहोमे
तभी मेरी कमी दुनियाकी हर ऎक छैय मे पायोगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....
 
कही पर भी रहे हम-तुम, मोहोब्बत फ़िर मोहोब्बत है
तुम्हे हम याद आयेंगे, हमे तुम याद आयोगे
मै उतना याद आउंगा ,मुझे जितना भुलाओगे....
जगजीतसिंगचे स्वर अंगाई सारखे हळुहळु मनात झिरपत होते. मनाची तगमग कमी होत गेली. ते स्वर सांगत होते मी आहे तुझ्या बरोबर..... तेव्हा चालत रहा............ चालत रहा.
जगजीतसिंगच फ़क्त माझ्यासाठीच गातच होत............
कभी गुन्छा , कभी शोला ,कभी शबनम की तरहा
लोग मिलते है बदलते हुवे मौसम की तरहा............